"राज्य संकटात आहे" त्या पत्रावरुन पंकजा मुंडे ठाकरे सरकारवर भडकल्या

Update: 2021-03-20 15:45 GMT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने मोठा गदारोळ उडाला आहे. या पत्रात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा दावा केला आहे.

या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी "राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे." असं म्हटलं आहे.

Tags:    

Similar News