वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा - रक्षा खडसे

Update: 2022-06-01 08:16 GMT

 काल जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुका व परिसरात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागांचे नुकसान झालेले असुन, याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी व संबधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहे. तरी सुद्धा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी विमा बाबत मागील गोष्टींचा अनुभव पाहता तत्काळ आपल्या नुकसानीची विमा कंपनी कडे ऑनलाईन / ऑफलाईन माहिती कळवावी जेणे करून भविष्यात विम्याचा लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले

Full View

Tags:    

Similar News