एकनाथ शिंदे यांच्या कृत्यामुळे शिवसेनेच्या नेत्या माध्यमांसमोर रडल्या..

Update: 2022-06-21 16:36 GMT

एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून सुरत येथील हॉटेल मध्ये आहेत. त्यांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ते भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे. त्यामुळे ते सोबतच्या आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे सुरतला त्यांच्यासोबत बातचीत केली. दरम्यान शिंदे यांच्या या कृत्यामुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुःखी झाल्याचा म्हणत दर दहा वर्षांनी अशा गोष्टींचा शिवसेनेला सामना करावा लागतो. भाजप नेत्यांना काही तरी गाजर दाखवत आहे. शिंदे साहेब परत या उद्धव ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील असं म्हणत त्या भावनिक झाल्या. माध्यमांसमोर बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आमचं घर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला एकनाथ शिंदे यांनी बळी पडू नये. शिवसेनेवरील हे संकट नसून ही कूटनीती आहे. एकनाथ शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. पुन्हा घरी परत या. हे सर्व पाहून बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा त्रास होत असेल असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घातली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 22 पेक्षा जास्त आमदार नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे. हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे बंड शमवण्यासाठी आता शिवसेना प्रयत्न करत आहे. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे सुरत येथे एकनाथ शिंदे ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली आहे. अवि एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा बोलणे झाले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर तीन प्रस्ताव ठेवल आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर सर्व शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई आणि राज्यातील आमदार पोहोचले होते. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. आता नक्की काय होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Tags:    

Similar News