प्रश्न विचारला आणि अमृता फडणवीस असं काही बोलून गेल्या...

Update: 2023-02-22 07:44 GMT

''राज्यात असं काही औषध शोधलं पाहिजे जेणेकरून अशी चिखलफेक बंद होईल आणि महाराष्ट्रात शांती राहील'' असं वक्तव्य करत अमृता फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला आहे. एका खासगी जेनेरिक औषधी प्रॉडक्टच्या उद्घाटन समारंभासाठी अमृता फडणवीस काल ठाण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन देखील केलं. यावेळी त्यांना उपस्थित पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तर यावेळी त्यांनी सुरुवातीला बोलणं टाळलं पण त्यानंतर त्यांनी नाव न घेता संजय राऊतांना टोला लगावला.

राज्यात मागच्या काही महिन्यांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकतंच शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळाले. राज्यात सध्या घडत असलेल्या याच राजकीय घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना "महाराष्ट्रात असं काही औषध शोधलं पाहिजे जेणेकरून अशी चिखल फेक बंद होईल आणि महाराष्ट्र शांत राहील" असं म्हणत टोला लगावला..

नक्की काय म्हणाल्या अमृता फडणवीस पहा..




Tags:    

Similar News