मनीषा कोइरालाने माधुरीला घाबरून 'दिल तो पागल है' नाकारला!

Update: 2024-04-23 15:15 GMT

मनीषा कोइराला यांनी नुकतेच एका मुलाखतीत 'दिल तो पागल है' या चित्रपटातील भूमिका नाकारल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आहे. संजय लीला भंसाली यांच्या 'हीरामंडी द डायमंड बझार' या चित्रपटातून मनीषा कमबॅक करत आहेत. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खुलासे केले.

यश चोप्रा यांनी मनीषाला 'दिल तो पागल है' मध्ये माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली होती. पण मनीषा यांना माधुरी इतकी उत्तम अभिनेत्री असल्यामुळे घाबर वाटले आणि त्यांनी ती भूमिका नाकारली. नंतर ती भूमिका करिष्मा कपूर यांनी साकारली आणि चित्रपट सुपरहिट झाला. आता मनीषाला त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. त्यांना असे वाटते की त्यांनी माधुरीसोबत काम करून खूप काही शिकले असते.

मनीषा यांनी माधुरी यांच्याबद्दल बोलताना म्हटले, "माधुरीजी एक उत्तम अभिनेत्री आणि व्यक्ती आहेत. मला असुरक्षित वाटून घेण्याची काहीही गरज नव्हती. माझ्यासमोर एक इतकी दमदार अभिनेत्री असताना तुम्ही अजून चांगलं परफॉर्म करू शकता. ते तुम्हाला अजून चांगलं परफॉर्म करायला प्रोत्साहन देतात आणि ते तुमचा अनुभव आणि वयचं तुम्हाला शिकवत."

'हिरामंडी द डायमंड बझार' मध्ये मनीषा मल्लिकाजान नावाच्या एका तवायफची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 1940 च्या दशकातील स्वातंत्र्यपूर्व भारतावर आधारित असून, चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Tags:    

Similar News