'कधी पर्यंत आमदार विकत घेऊन सरकार बनवणार?', विद्या चव्हाणांचा घणाघाती टोला

Update: 2020-05-16 05:09 GMT

कोरोना संपल्यानंतर कॉंग्रेस पक्षामध्ये भुकंप येणार असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी भाजपला हिम्मत असेल तर आत्मनिर्भर व्हा असं चॅलेंज केलं आहे.

हे ही वाचा..

भाजपने विधानपरिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना डावलल्यामुळे पक्षातील राजकीय हेवेदावे चव्हाट्यावर आले. एकनाथ खडसे यांनी नेहमीप्रमाणे स्पष्ट नाराजी व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोपांची फैरी उडवली आहे. विधानपरिषदेसाठी खडसेंनी फडणवीस यांना जबाबदार ठरवलं. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फडणवीस यांची बाजू सावरत खडसेंनी आता पक्षाच्या सल्लागाराची जबाबदारी सांभाळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सोबतच खडसेंना फुस लावणाऱ्या कॉंग्रेसने राज्यात कोरोनाच्या स्थितीत सुधार झाल्यानंतर पक्षातील राजकीय भुकंपासाठी तयार राहावं असं आव्हान केलं आहे. यावर विद्या चव्हाण यांनी “कधी पर्यंत आमदार विकत घेऊन सरकार बनवणार? हिम्मत असेल तर #आत्मनिर्भर व्हा!” असा घणाघाती टोला लगावला आहे. यावेळी विद्या चव्हाण यांनी भाजपचा आणि चंद्रकांत पाटील यांचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरीही त्यांचा रोख तिकडेचं असल्याचंही तितकंचं स्पष्ट आहे.