बाळाच्या पहिल्या १००० दिवसांचे महत्व काय? जाणून घ्या...

गर्भधारणेपासून ते दोन वर्षांपर्यंत, म्हणजेच जन्माच्या पहिल्या १००० दिवसांमध्ये मुलाची बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक वाढ वेगाने होते. या काळात योग्य पोषण मिळाल्यास मुलं सुपोषित आणि निरोगी बनतात. म्हणून बाळाच्या संगोपणाची काळजी घ्या...

Update: 2024-03-20 15:20 GMT

मूल जन्मल्याबरोबर पहिल्या १००० दिवसांच्या काळात अर्भकाच्या मेंदूच्या पेशींची निर्मिती आणि विकास वेगाने होत असतो. अशामध्ये मुलांच्या पोषणाची काळजी आई आणि वडिलांनी घेणे गरजेचे असते . या योग्य पोषणामुळे मेंदूचा विकास चांगल्या प्रकारे होतो आणि मुलं हुशार बनतात, आणि मुलं टवटवीत दिसण्यासोबतच ते चपळ देखील बनतात. या काळात मुलांची उंची आणि वजन वेगाने वाढते. योग्य पोषणामुळे मुलं निरोगी आणि मजबूत बनतात. म्हणजेच त्यांचा शारीरिक विकास होत असतो. तसेच मुलांची रोगप्रतिकारशक्ती विकसित होते. योग्य पोषणामुळे मुलं आजारांपासून बचाव करू शकतात त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. सोबतच मुलांचा भावनिक आणि सामाजिक विकास होत असतो. योग्य पोषणामुळे मुलं आनंदी आणि समंजस बनतात.

Full View

जागर पोषणाच्या या मोहीमेअंतर्गत बाळाच्या पहिल्या १००० दिवसांचे महत्व जाणून घेतले असून या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. 



भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना ( ) राबवली आहे. या योजनेचा उद्देश गर्भवती महिला आणि लहान मुलांना पोषण आणि आरोग्य सुविधा पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत, आंगणवाडी केंद्रांमध्ये महिलांना आणि मुलांना खालील सुविधा पुरवल्या जातात.

पोषण आहार: गर्भवती महिला, स्तनपान करणारी महिला आणि ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत पोषण आहार दिला जातो.

आरोग्य सेवा: आंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांची नियमित तपासणी केली जाते आणि त्यांना लसीकरण केले जाते.

शिक्षण: आंगणवाडी केंद्रांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्व-शाळा शिक्षण दिले जाते.

बाळाच्या पहिल्या १००० दिवसांमध्ये योग्य पोषण देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि जागर पोषण मोहीमेद्वारे सरकार मुलांना योग्य पोषण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. या मोहिमेमध्ये नागरिकांनीही सहभागी होऊन मुलांच्या पोषणासाठी योगदान द्यावे.

Tags:    

Similar News