औरंगाबाद हादरले! एकच कुटुंबातील तिघांची हत्या; सहा वर्षांचा मुलगा जखमी

Update: 2020-11-28 14:45 GMT

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकच कुटुंबातील तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. तर घरातील सहा वर्षाचा मुलगा मारेकऱ्यांनी मृत्यू झाला असे समजून सोडून दिल्याने सुदैवाने बचावला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पैठण शहरातील जुने कावसान भागात शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात राजू निवारे (40), अश्विनी राजू निवारे (35) व त्यांची मुलगी सायली निवारे (10) यांचा मृत्यू झाला आहे. तर राजू निवारे यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम याच्यावर सुद्धा हल्ला करत,मृत झाला समजून सोडून दिल्याने सुदैवाने तो बचावला आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी स्थनिक पोलिस,श्वान पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.हल्लेखोर कोण होते आणि हत्येच्या मागील कारण समजू शकले नाहीत.

Similar News