बालगृहातील २८४मुलींचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं कौतुक

Update: 2021-07-26 13:09 GMT

गेल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल आला, ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. पण याच विद्यार्थ्यांमध्ये शासनाच्या बालगृहात तसेच अनुरक्षण गृहात असणाऱ्या ५७४ मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. तर त्यांचे हे यश एक महत्वाचा टप्पा असून यापुढे ही त्यांच्या उच्चशिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

यातीलच एक म्हणजे सुमन ( नाव बदलेले ), तिच्यावर पाशवी अत्याचार झाले, तिच्या मनाचा चोळामोळा झाला, सर्व स्वप्न धुळीस मिळाली अशा विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलंय अशी तिची अवस्था, मात्र या अवस्थेवर, यातनावर मात करीत तिने आज भरारी घेत दहावीच्या शालांत परीक्षेत चक्क 97 टक्के गुण मिळवले. तिच्या यशाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले आहे.

ही गोष्ट तिच्या एकट्या सुमनची नाही तिच्यासारख्याच बालगृह आणि अनुरक्षण गृहातील अन्य विद्यार्थ्यांनी सुद्धा घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही महिला बाल विकास मंत्री ठाकूर यांनी दिली आहे. शासनाच्या बालगृहात तसेच अनुरक्षण गृहात असणाऱ्या ५७४ मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. या विद्यार्थीच्या उच्चशिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार असल्याच यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्यातील विविध कारणास्तव आधाराची गरज असलेली मुले बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मुले पुनर्वसानाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात आहेत. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. अत्याचार झालेल्या किंवा अन्य कारणांमुळे बालगृहात यावे लागलेल्या तसेच वाट चुकल्यामुळे अनुरक्षण गृहात यावे लागलेल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षण यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते. त्याच अनुषंगाने दहावीच्या परीक्षेला राज्यातील विविध बालगृह आणि अनुरक्षण गृहातील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते, यापैकी

या मुलांनधील ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात २८४ मुली आणि २९० मुलं आहेत.

लक्षणीय बाब म्हणजे यातील सुमारे 60 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या श्रेणीत अथवा विशेष श्रेणीत प्राविण्य मिळवले आहे. या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी आणि कौशल्य विकास शिक्षणासाठी महिला बाल विकास विभागाच्या वतीने सर्वतोपरी मदत करून त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार असल्याचा असल्याची ग्वाही मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुकही त्यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News