शाळांबरोबर राज्यातील कॉलेजही सुरु होणार?

Update: 2021-09-25 10:34 GMT

राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.  ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी दिली. तर आता राज्यातील कॉलेज देखील लवकरच सुरू होणार आहे. याबाबतची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे दिली आहे.

यावेळी बोलतांना उदय सामंत म्हणाले की, राज्यातील कॉलेज लवकरच सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार राहावं. सर्व कुलगुरूंना याबाबत सुचना देण्यात आल्या असून येत्या आठ दिवसात त्याबाबत अहवाल तयार होईल. दरम्यान, अहवाल आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांना दाखवला जाईल आणि कॉलेजबाबतचा निर्णय होईल. त्यामुळे कॉलेज आता सुरू होणार या मानसिकतेमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी राहावं असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags:    

Similar News