राज्यात 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

राज्यात 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

Update: 2021-08-05 02:09 GMT

महाराष्ट्रासह दक्षिणात्य राज्यांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र अपेक्षित पाऊस झाला नाही. 

पण आता पुढील काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे,सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

शिवाय ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News