राज्यात नवीन कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा घटतोय...

राज्यात आज 5 हजार 916 लोक कोरानातुन बरे होऊन घरी गेले आहेत.

Update: 2021-09-07 02:52 GMT

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. राज्यात आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. सरकार अनेक निर्बंधात शकतीलता आणत आहे. काल मंगळवार राज्यात नवीन 3 हजार 636 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 5 हजार 916 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 67 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

आजपर्यंत एकूण 63 लाख 89 हजार 800 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.9 टक्के एवढे आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असली तरी अजूनही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. पण दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

Tags:    

Similar News