कोरोना संदर्भात आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी...

राज्यात काल जितके कोरोनाबाधित रुग्ण सापडले त्याहून दुप्पट लोक कोरोनावर मात करून घरी गेले आहेत..

Update: 2021-09-20 03:34 GMT

राज्यात आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात ज्या प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण सापडत होते त्यापेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही अधिक होती. पण आता राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या ही रोज सापडत असलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा दुप्पट झाली आहे. सध्या महाराष्ट्रात अजूनही कोरोनाची दुसरी लाट ओसरली नाही आहे. सरकार सर्वांना लसीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यातून आता जे काही समोर येत आहे त्याप्रमाणे रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे होत आहेत ही अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे.

काल मंगळवार राज्यात नवीन 3 हजार 413 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 8 हजार 326 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 49 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. आजपर्यंत एकूण 63 लाख 36 हजार 887 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 16 टक्के एवढे आहे.

Tags:    

Similar News