काल राज्यात 3 हजार 50 रुग्ण कोरोनामुक्त, आकडेवारीत घट

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून काल दिवसभरात 3 हजार 320 नवीन कोरोनाबधितांची नोंद.

Update: 2021-09-24 02:54 GMT

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. त्यामुळे आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर होतं आहे. लवकरात लवकर सर्वांना लसीचे दोन्ही डोस मिळावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सध्या राज्यातील कोरोणा रुग्णांची संख्या पाहिली तर काल गुरुवारी, नवीन 3 हजार 320 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 3 हजार 50 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 61 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. तर राज्यात एकूण ३९ हजार १९१ करोना बाधित रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 63 लाख 53 हजार 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 टक्के एवढे आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असली तरी अजूनही नवीन कोरणा बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. पण दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

Tags:    

Similar News