राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत कोकणातील सात बारा हा मुदा उपस्थित करून पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र कोकणतील शेतकऱ्यांचे एका सात बारावर एकापेक्षा जास्त नावं आहेत. त्यामुळे ही नुकसान भरपाई त्वरित मिळण्यासाठी हा विषय गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. नाहीतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात अडचणी येतील. कोकणात मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो यामध्ये यांत्रिबोटीचा वापर जास्त केला जातो. त्याचबरोबर कोकणात अनुसूचित समाजाला वेगळी तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. आपल्या मतदारसंघात पंचायत, ग्रामपंचायत यांचा विस्तार करण्याची मागणी यावेळी आदिती तटकरे यांनी केली.
https://youtu.be/6DbV6kzSmU4