तिवसा मतदार संघाच्या आमदार व राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकुर ह्या मंत्री झाल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्यात आल्या त्यामुळे त्यांनी आपल्या तिवसा मतदान संघातील शेंदूरजना बाजार येथे कपाशी व केळीच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली.
काल तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले त्यावेळी खरीप हंगाम सह रबी पिकाला मोठ्या प्रमाणावर या गारपीटने नुकसान झाले होते त्यामुळे यशोमती ठाकुर यांनी मतदार संघात आल्या आल्या नुकसान झालेल्या शेतीत जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांना धीर दिला यावेळी त्यांच्या सोबत एसडीओ, तहसीलदार सह अधिकारी उपस्थित होते.
https://youtu.be/oL5obSEtzrk