आजवर सत्तेपासून वंचित असलेल्या समाज घटकाला सत्तेच्या प्रवाहात सामिल करुन घेण्याकरीता बाळासाहेब आंबेडकर व असदूद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचा भक्कम पर्याय उभा केला. सत्तेच्या माध्यमातून आगरी, कोळी, आदिवासी, प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टी धारक,भुमिपूत्र, शेतकरी, कामगार, कूळ, विद्यार्थी, मच्छिमार अशा वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुमन कोळी यांनी दिलंय.