काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांची आज दिल्लीत भेट हेणार असून त्यांच्या भेटीत काय निर्णय होणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेसंदर्भात संघर्ष चाललेला असताना आजची ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल आहे तर शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही चर्चा सुरु आहेत. म्हणूनच शरद पवार आणि सोनिया गांधींच्या या भेटीतन सत्तास्थापनेविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच ‘त्या’ नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश भाजपा आणि अपक्ष असे मिळून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. भाजपात गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक आहेत पण स्थानिक नेत्यांशी बोलुनच या नेत्यांना परत पक्षात घेण्याबाबत विचार करु असं पाटील यांनी स्पष्ट केलं.