सत्ताधारी भाजपाचा जोरदार प्रचार सध्या देशातील कानाकोपऱ्यात होत आहे. मात्र प्रत्यक्षात या जाहिरातीमधली किती काम झाली हे तुम्हालाच माहिती आहे. देशातील जनतेनं या सरकारला प्रश्न विचारला तर त्या जनतेला देशद्रोही ठरवलं जातं आणि स्वतःला हे सरकार राष्ट्रवादी म्हणत आहे. हे सरकार स्वतःला राष्ट्रवादी म्हणून घेत आहे तर शेतकरी प्रश्न, शहीद सैनिक, बेरोजगारी, महिलांच्या प्रश्नाविरोधात का काही करत नाही... जनता जेव्हा प्रश्न करते तेव्हा तुम्ही त्यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहात. अशा अनेक मुद्द्यांवर काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर टीका केली आहे. त्या उत्तर प्रदेशातील फतेहपूर मधल्या सिक्रीत बोलत होत्या. पाहा हा व्हिडिओ..
https://www.facebook.com/IndianNationalCongress/videos/308279623403267/