निवडणुका सुरु झाल्या असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यामांशी बोलताना मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००४ चा इतिहास विसरु नये, अटल बिहारी वाजपेयीही अजिंक्य होते मात्र त्यावेळी आम्हीच जिंकलो होतो. 2004 मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील मात्र त्यांचा दावा खोटा ठरवत जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं अशी आठवण करुन देत सोनिया गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.
https://twitter.com/INCIndia/status/1116269243891191808