रविवारी झालेल्या शेवटच्या टप्यानंतर माध्यमांनी एनडीएला बहुमत दिले आहे. यावरून अनेक राजकीय व्यक्तींनी संशय व्यक्त केला आहे. या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून यासंदर्भात एक्झिट पोलच्या आकडेवारीविषयी संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होत असून त्याचे पुरावे आहेत तर निवडणूक आयोग यावरती कारवाई का करत नाही असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. देशात खोटी लाट निर्माण झाली आहे. यावरून पुन्हा एकदा बालाकोटची प्रक्रिया सुरु असल्याचे दिसत आहे, असं मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/MehboobaMufti/status/1130697523033542656