यंदा पावसाळा संपल्यानंतरही पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. यासंदर्भात बीड जिल्यातील भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार पत्र पाठवले आहे.
जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या या नुकसानावर कारवाही व्हावी म्हणून प्रितम मुंडे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातील पिकांचे नुकसान पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला आहे.