मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्वाचा आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात राजगड येतो त्या तालुक्याला ‘राजगड’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जुन्या दस्तऐवजात, अगदी शिवकाळातही या तालुक्याचा उल्लेख राजगड तालुका असाच सापडतो. याशिवाय इतिहास संशोधन मंडळातही राजगड असाच उल्लेख आहे अशी माहिती यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.
विशेष म्हणजे जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत 'राजगड तालुका' असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. (३/४)
— Supriya Sule (@supriya_sule) July 30, 2019
मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. (२/४)
— Supriya Sule (@supriya_sule) July 30, 2019