‘नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं’ असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने करून भाजप समोर नवा वाद निर्माण केलं आहे. नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली आहे.
दरम्यान न्यूज २४ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी हे अत्यंत चुकीचं असून, त्यांना कधीच माफ करु शकत नाही असं म्हटलं आहे.तर अशी वक्तव्य चुकीची असून समाजासाठीही वाईट आहेत असे वक्तव्य करताना १०० वेळा विचार करायला हवा, त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना कधीच माफ करु शकणार नाही’ असं मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदी म्हटले.
https://twitter.com/BJP4India/status/1129314839564673024