Home > मग दारुड्यांना आता शासनदाता असं नाव ठेवावं- तृप्ती देसाई

मग दारुड्यांना आता शासनदाता असं नाव ठेवावं- तृप्ती देसाई

मग दारुड्यांना आता शासनदाता असं नाव ठेवावं- तृप्ती देसाई
X

देशभरात Lockdown 3.0 च्या कालावधीमध्ये १७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये केंद्र शासनाने राज्य सरकारांना आपल्या राज्यातील परिस्थिती अनुरुप निर्णय घेत व्यवसाय आणि उद्योग सुरु करण्य़ाची परवानगी दिली. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोननुसार लॉकडाऊन शिथिल करण्याचे आदेश देण्यात आले.

देशभरातील मद्यप्रेमींच्या आणि राज्य सरकारांच्या महसूलाच्या दृष्टीने महत्वाची असलेली दारूची विक्री सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दारूची दुकानं उघडणार म्हणून मद्यप्रेमिंनी दारूच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. सोशल डिस्टसिंगचा नियम धाब्यावर बसवला आहे.

हे ही वाचा...

दारुची दुकान उघडण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. अर्थव्यवस्था दारुड्यावर अवलंबून आहे का? जर असं असेल तर या दारुड्यांना शासनदाता म्हणून नाव ठेवावं. त्यांच्यावर हेलीकॉप्टरमधून फुलं उधळून सत्कार करणार का? त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवणार का? असा आक्रमक पवित्रा घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ( Trupti Desai) यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात घेतला आहे. ‘दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, नाहीतर सरकारसाठी निर्णय घातक आणि धोक्याची घंटा असेल’ असा इशारा दिला आहे.

‘वा रे सरकार तेरा खेल अब लॉक डाऊन होगा फेल’ असं म्हणतं तृप्ती देसाई यांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. लॉग डाऊन फेल होण्याआधी आणि कोरोनाचे पेशंट वाढण्याआधी तातडीने दारूची दुकाने बंद करण्यात यावीत. दारुची विक्री सुरु राहिल्यामुळे घरगुती हिंसाचार वाढेल, गुन्हेगारी वाढेल, पोलिसांवरील हल्ले वाढतील. अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

‘उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरकार दारुची विक्री सुरु करून दारु पिणाऱ्या लोकांनी समर्थन देतंय का?’ असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. ‘महसूल हवा आहे आमदार निधी सहा महिने बंद करा. कोणी आमदार झोपडीतून आले नाहीत. पैसे वाटूनच निवडून आले आहेत. इतर चैनीच्या वस्तूंवरील कर दोन टक्क्याने वाढवा, जास्त महसूल राज्य सरकारला मिळेल.’ असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

‘दारुच्या विक्रीतून मिळणारा महसूल म्हणजे महिलांचा शाप आहे आणि पण महिलांचे शाप असणारा पैसा महसूल म्हणून स्वीकारू नका अन्यथा सरकारला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही’ असं मत तृप्ती देसाई यांनी यापुर्वीही व्यक्त केलं होतं. “दारुमुळे महिलांवरील हिंसाचाराच्या घटना वाढतील. कोपर्डी आणि हैद्राबादमधील मधील दुर्देवी घटना या दारुच्या नशेतच झाल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घेतलेला हा निर्णय महिलांसाठी घातक आहे. तसेच आता दारु पिण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे उरले नाही ते घरात उरलं सुरलं विरुन दारु पितीलं.” असं भीती त्यांनी व्यक्त केली.

सुप्रियाताई सुळे, रश्मीजी ठाकरे, नीलम ताई गोर्हे यांना महिलांच्या समस्या माहीत असूनही आणि यांचे सरकार असूनही असा निर्णय घेण्यात आला आहे, याचे वाईट वाटत आहे. अशी खंतही तृप्ती देसाई य़ांनी व्यक्त केली.

Updated : 5 May 2020 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top