Home > आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी अडचणीत, वाचा काय आहे प्रकरण?

आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी अडचणीत, वाचा काय आहे प्रकरण?

आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी अडचणीत, वाचा काय आहे प्रकरण?
X

रिपब्लिक भारत (Republic Bharat) चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. कारण त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने सीआयडी (CID) चौकशीला परवानगी दिली आहे. आज्ञा नाईक यांनी केलेल्या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याने त्यांचे वडील आणि आजीने आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा...

तसंच अलिबाग पोलिसांनी याची नीट चौकशी केली नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याने बंद करण्यात आलेल्या या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

गेल्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला FIR रद्द करण्यास नकार देत अर्णब गोस्वामी यांना धक्का दिला होता.

पालघर मॉब लिंचिंग (Palghar mob lynching) प्रकरण आणि तसंच वांद्रे स्टेशनवर झालेल्या गर्दी प्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी FIR नोंदवण्यात आले होते.

सुप्रीम कोर्टाने सर्व एफआयआर रद्द करत एक एफआयआर मात्र कायम ठेवून अर्णब यांना धक्का दिला होता. आता या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशीमुळे गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

दोन वर्षांनंतर, ५ मे रोजी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी व्हिडिओद्वारे केली.

या मागणीवर राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं .

कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी २०१८ मध्ये अलिबागमधील काविर गावातील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

आत्महत्येपूर्वी अन्वय यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आत्महत्या करत असल्याचं त्या चिठ्ठीत लिहलं होतं.

नाईक यांनी रिपब्लीक भारतच्या स्टूडिओचं काम ५०० माणसांच्य़ा मदतीने रात्रंदिवस राबत करवून घेतलं होत असं त्यांच्य़ा पत्नीने सांगितलं आहे. त्यानंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

एफआयआर दाखल केल्यानंतर दोन वर्षांत पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. चौकशीसाठी घेतलेले मोबईल आणि लॅपटॉपही अद्याप त्यांना परत केलेले नाहीत.

तसंच माझ्या आणि मुलीच्या जीवाला धोका असून, आम्हाला काही झालं तर अर्णब गोस्वामी, अनिल पारसकर, सुरेश वऱ्हाडे हे पोलिस अधिकारीही त्यास जबाबदार असतील, असंही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं.

Updated : 27 May 2020 2:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top