Home > Political > कंगना रणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

कंगना रणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

कंगना रणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
X

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेद्वार कंगना रणौत काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान, कंगना रणौत म्हणाली की , मी भांडत नाही , पण जर तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा मार खाण्याची तयारी ठेवा.पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निवडणूकीतील विजय हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असेल असं सांगितलं.

मंडी मतदारसंघातील काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेद्वार विक्रमादित्य सिंह यांनी केलेल्या टिकेचा संदर्भ देत. कंगना रणौत म्हणाली की, निवडणूका मुद्यांवर लढल्या पाहिजेत , परंतू जर आपमानास्पद शब्द वापरला तर त्यांनी तशीच भाषा एकण्याची तयारी ठेवावी. माझा मागचा रेकॉर्ड बघा, मी कोणालाही आव्हान देऊ शकते, नेहमीच मला सर्वात आधी लक्ष केलं जातं. कंगना रणौत म्हणाली, "मी कोणाशीही भांडत, पण जर कोणी मला बोलंल तर शांतपणे सहन करणारी देखील मी नाही.जर तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा मार खाण्याची तयारी ठेवा" .



कंगना रणौतने मंगळवारी मंडी लोरकसभा मतदारसंघातून निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच कंगनाला कुल्लू टोपीघातल्याबद्दल विचारले असता, ती म्हणाली की हा एक पारंपारिक दागिना आहे. जो शुभ दिवशी परिधान केला जातो. " मला वाटतं की आज ती घालण्याची योग्य वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा पाठिंबा आहे. मोदींची गॅरंटी आहे. असं देखील कंगना रणौतनेम्हटल आहे.



Updated : 16 May 2024 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top