Home > News > दारूविक्रीचा निर्णय सरकारसाठी धोकादायक - तृप्ती देसाई

दारूविक्रीचा निर्णय सरकारसाठी धोकादायक - तृप्ती देसाई

दारूविक्रीचा निर्णय सरकारसाठी धोकादायक - तृप्ती देसाई
X

(Turpti Desai) देशभरात Lockdown 3.0 च्या कालावधीमध्ये १७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये केंद्र शासनाने राज्य सरकारांना आपल्या राज्यातील परिस्थिती अनुरुप निर्णय घेत व्यवसाय आणि उद्योग सुरु करण्य़ाची परवानगी दिली. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोननुसार लॉकडाऊन शिथिल करण्याचे आदेश देण्यात आले.

देशभरातील मद्यप्रेमींच्या आणि राज्य सरकारांच्या महसूलाच्या दृष्टीने महत्वाची असलेली दारूची विक्री सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दारूची दुकानं उघडणार म्हणून मद्यप्रेमिंनी दारूच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. सोशल डिस्टसिंगचा नियम धाब्यावर बसवला आहे

हे ही वाचा...

(Turpti Desai) दारुची दुकान उघडण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. अर्थव्यवस्था दारुड्यावर अवलंबून आहे का? जर असं असेल तर या दारुड्यांना शासनदाता म्हणून नाव ठेवावं. त्यांच्यावर हेलीकॉप्टरमधून फुलं उधळून सत्कार करणार का? त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवणार का? असा आक्रमक पवित्रा घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ( Trupti Desai) यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात घेतला आहे. ‘दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, नाहीतर सरकारसाठी निर्णय घातक आणि धोक्याची घंटा असेल’ असा इशारा दिला आहे.

Updated : 6 May 2020 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top