महाराष्ट्राच्या प्रश्नावर सोनिया गांधी गप्प

Update: 2019-11-20 12:32 GMT

महाराष्ट्रातील सत्तापेच अजूनही कायम असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाकडे लागले आहेत. यावर डिसेंबरच्या आधी महाराष्ट्रात नवं सरकार येईल, असा विश्वास शिवसेना व्यक्त करत आहे. मात्र सत्तापेचावर बोलण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(sonia gandhi) यांनी नकार दिला असल्यामुळे या सत्तापेचाचा सस्पेन्स वाढला आहे. राज्यात बिगर भाजप सरकार येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अद्याप कोणतंही जाहीर वक्तव्य केलेलं नाही.

Similar News