हाथरस मधील दलित मुलीवर पुरुषांनी केलेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतरचा तिचा खून. या घटनेला एक महिना झाला तरी आपण विसरू शकलेलो नाही. या नंतर कुठेच अशा घटना होऊ नयेत यासाठी काम करणाऱ्या संविधान प्रेमी महिला एकत्र येऊन म्हणत आहेत की, "आता उठाव केला नाही तर". आमच्या पुरोगामी राज्यात स्वातंत्र्यानंतरच्या ७३ वर्षानंतरही आजही दलित, आदिवासी, पारधी, भिल्ल, वैदू, भटक्या जाती जमाती आणि वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रिया, हिजडा यांना रोजच लिंग आणि जात विषमतांना सामोरे जावं लागणार आहे.
Updated : 29 Oct 2020 11:12 AM GMT
Next Story