Home > व्हिडीओ > केंद्र सरकारला गोरगरिबांच काही घेणंदेणं नाही – मंत्री यशोमती ठाकुर

केंद्र सरकारला गोरगरिबांच काही घेणंदेणं नाही – मंत्री यशोमती ठाकुर

केंद्र सरकारला गोरगरिबांच काही घेणंदेणं नाही – मंत्री यशोमती ठाकुर
X

अमरावती : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत. बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या या कृषी कायद्यासंदर्भात बोलताना मंत्री यशोमती ठाकुर म्हणाल्या की, "केंद्र सरकारने लागु केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. हे कायदे फक्त व्यापारी वर्गाच्या हिताचे असल्याने सर्वांनी बंद मध्ये सहभागी व्हावे. केंद्र सरकारला गोरगरिबांच काही घेणंदेणं नाही. त्यामुळे या बंदला सर्वांनी प्रतिसाद द्यावा." असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

Updated : 8 Dec 2020 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top