कोरोनाच्या संकटात देशभरातील मजुरवर्ग आपल्या घरी जाण्याचा प्रय़त्न करत आहे. उद्योग धंदे बंद असल्यामुंळे हातावर पोट असलेल्य़ांची मोठी अडचण होत आहे. हातात पैसा नाही. घरात असलेलं अन्नधान्य संपलेलं असताना लॉकडाऊन वाढल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अशावेळी जमेल तसं हा मजूरवर्ग आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहे.
अमरावती जिल्ह्यातून मजूरांसाठी आज विशेष श्रमिक स्पेशल सोडण्यात आली. या रेल्वेला खासदार नवनीत कौर राणा आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी ग्रीन सिग्नल देत त्यांना निरोप दिला. यापुर्वी नवनीत राणा यांनी ट्रेनमधील प्रवाशांसोबत संवाद साधला. पाहा व्हिडीओ...
https://www.facebook.com/navneetkaurranaofficial/videos/552643568961827/?t=2207
Updated : 9 May 2020 3:31 PM GMT
Next Story