Home > Political > भाजपचा विजय का होत होता? सुषमा अंधारे म्हणतात..

भाजपचा विजय का होत होता? सुषमा अंधारे म्हणतात..

भाजपचा विजय का होत होता? सुषमा अंधारे म्हणतात..
X

भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) प्रतिष्ठेची केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे आज निकाल समोर आले. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसाबा मतदार संघात भाजपचा पराभव झाला. एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. आता कसब्यात झालेल्या पराभवानंतर विरोधकांनी टोलेबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता, आज खरी शिवसेना महाविकासआघाडीबरोबर आहे त्यामुळे निर्णयही मविआच्या बाजूने आहे. असं म्हणत त्यांनी कसब्यातील भाजपच्या पराभवावर मत व्यक्त केले आहे. इतकाच नाही त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाला आणखीन देखील टोले लगावले आहेत.

काल पिंपरी चिंचवड व कसबा पोटनिवडणुकांचे निकाल समोर आले. त्यानंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे वाशीम मध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी, लोक चिडलेले आहेत आणि जनमताचा कल आता महाविकास आघाडीच्या बाजूने होतं आहे हे स्पष्ट होतं आहे. जोपर्यंत खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता. आज खरी शिवसेना महाविकासआघाडीबरोबर आहे त्यामुळे निर्णयही मविआच्या बाजूने असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.

Updated : 3 March 2023 5:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top