Home > Political > सुभाषचंद्र बोस यांनी लग्नाआधी पत्नीला लिहलं होतं हे प्रेमळ पत्र

सुभाषचंद्र बोस यांनी लग्नाआधी पत्नीला लिहलं होतं हे प्रेमळ पत्र

सुभाषचंद्र बोस यांनी लग्नाआधी पत्नीला लिहलं होतं हे प्रेमळ पत्र
X

'मला माहीत नाही, माझं काय होईल? पण तू नेहमी माझ्या हृदयात, माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या स्वप्नांमध्ये असेल. जर आपण या जन्मात भेटलो नाही तर पुढच्या जन्मात मी तुझ्यासोबत असेन.'

ही गोष्ट सुभाषचंद्र बोस यांनी त्या स्त्रीसाठी लिहिली होती जिच्यावर त्यांचे अपार प्रेम होते. नेताजींना प्रेमात अडकवणाऱ्या या महिलेचे नाव एमिली शँकेल. 1936 मध्ये एमिलीला लिहिलेल्या पत्रात नेताजींनी तिला 'my darling' म्हणजेच 'माझ्या हृदयाची राणी' असे संबोधले होते. आज नेताजींचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आम्ही तुम्हाला नेताजी आणि एमिली यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल.

अशा प्रकारे नेताजी एमिलीला भेटले

हा 1934 चा काळ होता. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे नेताजींचे वास्तव्य होते. नेताजी उपचारासाठी व्हिएन्ना येथे गेले आणि याच काळात एका युरोपियन प्रकाशकाने नेताजींना 'द इंडियन स्ट्रगल' हे पुस्तक लिहायला सांगितले. यासाठी नेताजींना इंग्रजी टायपिंग आणि इंग्रजी दोन्ही जाणणाऱ्या व्यक्तीची गरज भासू लागली. त्यासाठी नेताजींना दोन उमेदवार सुचवले होते. यापैकी एक उमेदवार नेताजींनी नाकारला होता.

दुसरी उमेदवार एमिली शेंकल,जी तेंव्हा 23 ​​होती. नेताजींनी एमिलीची मुलाखत घेतली आणि नंतर तिला कामावर घेतले. त्यावेळी सुभाषचंद्र बोस 37 वर्षांचे होते आणि तोपर्यंत ते प्रेम आणि आपुलकीपासून दूर राहिले होते. पण एमिलीच्या आगमनानंतर नेताजींचे आयुष्यच बदलून गेले आणि ते एमिलीच्या सौंदर्यात आणि प्रेमात कधी अडकले हे त्यांनाच कळले नाही.

आणि मग सुरू झाली नेताजी-एमिलीची प्रेमकहाणी

26 जानेवारी 1910 रोजी ऑस्ट्रियातील कॅथोलिक कुटुंबात जन्मलेल्या एमिली शेंकल यांनी 1934 पासून नेताजींसोबत काम करण्यास सुरुवात केली. एमिलीने सुगत बोस यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, 'सुभाष चंद्र बोस यांनी प्रेमाची सुरुवात केली आणि त्यानंतर 1934 ते 1936 पर्यंत आमचे नाते रोमँटिक झाले.

सुगत बोसच्या म्हणण्यानुसार, सुभाषचंद्र बोस यांना लग्नाच्या अनेक ऑफर आल्या, पण नेताजींनी त्यात रस घेतला नाही, पण नेताजी एमिलीच्या सौंदर्याने पूर्णपणे मोहित झाले.

प्रिये, तू माझ्या हृदयाची राणी आहेस..

5 मार्च 1936 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी एमिलीला एक 'प्रेम पत्र' लिहिले. इंग्रजीत लिहिलेल्या या पत्रात नेताजी लिहितात, 'माझ्या प्रिये, वेळ आल्यावर एक बर्फाळ पर्वतही वितळतो, माझ्या मनात अजूनही तीच भावना आहे. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे सांगण्यासाठी काहीतरी लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. प्रिये, तू माझ्या हृदयाची राणी आहेस, पण तू माझ्यावर प्रेम करतेस का?

मला माहित नाही भविष्यात माझे काय होईल? मला माझे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागू शकते, मला गोळी लागू शकते किंवा फाशी दिली जाऊ शकते. कदाचित मी तुला पुन्हा भेटू शकणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव, तू नेहमी माझ्या हृदयात राहशील. तू माझ्या विचारात आणि माझ्या स्वप्नात असशील. या जन्मात भेटलो नाही तर पुढच्या जन्मात मी तुझ्यासोबत असेन. शेवटी नेताजी लिहितात, शेवटी नेताजी लिहितात, 'माझं तुझ्या मन आवडतं .तू पहिली स्त्री आहेस जिच्या मी प्रेमात पडलो .

Updated : 23 Jan 2023 6:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top