Home > Political > 'रक्ताने ज्यांचे हात माखले ते काय न्याय देणार; केंद्रीय मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे'
'रक्ताने ज्यांचे हात माखले ते काय न्याय देणार; केंद्रीय मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे'
Team | 12 July 2021 6:32 AM GMT
X
X
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi ) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत 36 जणांचा समावेश केला. मात्र, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. यावरूनच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी भाजप सरकारवर हल्ला हल्ला चढवला आहे. चाकणकर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, 'देशाच्या मंत्रिमंडळातील 42% मंत्र्यांवर खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारांच्या शासनात आपण कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. जिनके हाथ खून से रंगे हो, वो क्या इंसाफ देंगे आपको...?,'असा खोचक टोला चाकणकर यांनी मोदी सरकारला लावला आहे.
Updated : 12 July 2021 6:32 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire