ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाडा परिसरात भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा ओबीसी समाजाचे नेते समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
यासंदर्भात बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तसंच राज्य सरकारने उच्च, सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा." असं म्हटलं आहे.
दरम्यान, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथे धडकणार होता. पण पोलिसांनी मोर्चाची परवानगी नसल्याचे कारण देत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Updated : 3 Dec 2020 8:15 AM GMT
Next Story