Home > Political > रश्मी ठाकरे बोलल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंड शमणार..?

रश्मी ठाकरे बोलल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंड शमणार..?

रश्मी ठाकरे बोलल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंड शमणार..?
X

एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून सुरत येथील हॉटेल मध्ये आहेत. ld/wxvrयांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ते भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे. त्यामुळे ते सोबतच्या आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे सुरतला त्यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी गेले आहेत. दरम्यान रश्मी ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली असल्याचं म्हंटल जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 22 पेक्षा जास्त आमदार नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे. हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना त्यांनी आता एक सूचक ट्विट केले आहे. "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे

एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे बंड शमवण्यासाठी आता शिवसेना प्रयत्न करत आहे. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे सुरत येथे एकनाथ शिंदे ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. आता त्या दोघांमध्ये काय चर्चा होते आणि एकनाथ शिंदे यांची ते मनधारणा करू शकतात का हे येणाऱ्या काळात समजेल. हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला आल्याचं म्हंटल जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर सर्व शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई आणि राज्यातील आमदार पोहोचले होते. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर तीन प्रस्ताव समोर ठेवले असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. आता नक्की काय होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Updated : 21 Jun 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top