- चित्रा वाघ यांचा भाजपने वापर करून घेतला का?
- यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
- अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
- Lawasa Case : सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका..
- मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..
- ''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या
- मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र
- ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
- देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी
- तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

प्रियांका गांधी नजरकैदेत; शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असतांना उत्तर प्रदेश सरकारने वाटेतच रोखले
X
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा सोमवारी सकाळी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी लखीमपूर खेरीला येथे पोहोचणार होत्या, परंतु त्यांना हरगावजवळ ताब्यात घेण्यात आले. रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यांनतर शेतकऱ्यांच्या भेटीसाठी प्रियंका गांधी रात्री 1 वाजता निघाल्या होत्या. मात्र त्यांना पोलिसांनी हरगाव येथून ताब्यात घेत सीतापूर पोलीस लाईनमध्ये नेले असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.
ये उत्तर प्रदेश पुलिस है। सत्ता के अहंकार में आवाज दबा रहे हैं। किसानों के परिवार से मिलने से रोका जा रहा है।
— UP Congress (@INCUttarPradesh) October 4, 2021
न्याय की आवाज़ कभी दबती नहीं है।#लखीमपुर_किसान_नरसंहार pic.twitter.com/0HrPujAPzG
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका गांधी ह्या सकाळी 6 च्या सुमारास लखीमपूर खेरीच्या सीमेवर पोहचल्या होत्या. तर प्रियंका गांधींना शेतकऱ्यांच्या भेटीपासून रोखल्या जाण्याची शक्यता आधीच कॉंग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आली होती. तर अखिलेश यादव आणि इतर नेतेही नजरकैदेत असल्याची माहिती समोर येत आहे.