- कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक...
- प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या..?
- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..

अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव...
विषारी दारूमुळे गावातील आठ ते दहा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
X
नांदेड: जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागातील गोंडे महागाव येथे रसायन मिश्रीत हात भट्टी व अवैध देशी दारू बंद करा या मागणीसाठी संतप्त झालेल्या महिलांनी इस्लापूर पोलीस ठाण्याला घेराव घालत दारू बंदीची मागणी केली. यावेळी काही काळासाठी गोंधळ उडाला होता.
किनवट तालुक्यातील गोंडे महागाव येथे दहा ते पंधरा रसायनमिश्रीत हात भट्टीद्वारे विषारी गावठी दारू काढून गावांमध्ये खुलेआम विकण्यात येते. धक्कादायक म्हणजे या विषारी दारूमुळे गावातील आठ ते दहा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गावातील तरुण आणि शिक्षण घेणारे अनेक विध्यार्थी सुद्धा दारूच्या आहारी जात आहे.
याच अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे शेजारील राज्यातून सुद्धा चोरट्या मार्गाने गावात दारू विक्री साठी आणण्यात येत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे संतप झालेल्या गावातील महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरत, अवैध दारू बंद करण्याची मागणी केली.