- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

"देशात लागलेली आग तुम्हा तरूणाईला विझवायची आहे", ॲड यशोमती ठाकूर यांची तरुणाईला साद
देशातील सतत बिघडत असलेली परीस्थिती फक्त तरूणाईच बदलू शकते अशी साद मंत्री यशोमती ठाकूर यांनी तरूणाईला घातली आहे.
X
देशाला कुणाची तरी नजर लागली आहे. तसेच देशात जी आग लावली जात आहे, ती विझवण्यासाठी तरुणाईने काम केले पाहिजे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी माटुंगा येथील एम.पी.शहा मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव कार्यक्रमात केले. तसेच देशाला कुणी बिघडवत असेल, तर देशाचे सैनिक म्हणून तुम्ही हे होऊ देऊ नका, अशी साद तरुणाईला घातली.
एम. पी. शहा मुलींचे कनिष्ठ महाविद्याल, याचा वार्षिक स्नेहसंमेलन, गुणगौरव सोहळा मुंबई, माटुंगा येथील मानव समाज सेवा मंडळाच्या सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल, विश्वस्त प्रवीण शहा, भरत पाठक, प्राचार्या लीना राजे आदी मान्यवर उपस्थित होते.
एम. पी. शहा मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणासोबतच सामाजिक जाणिव ठेऊन अतिशय चांगल्याप्रकारे काम करीत आहे. गुण टक्केवारीच्या या युगात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला प्रवेश देऊन, प्रसंगी स्वतः शैक्षणिक शुल्क भरून संस्थेने अनोखा आदर्श जगासमोर ठेवला आहे. याबद्दल ॲड. यशोमती ठाकूर यांनी संस्थेच्या विश्वस्तांचे कौतुक केले. आमदार अमीन पटेल यांच्या माध्यमातून संस्थेला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल ॲड. यशोमती ठाकूर यांनी पटेल यांचेही विशेष कौतुक केले. तसेच याबाबत कोणतीही मदत लागल्यास आम्हालाही हक्काने सांगा असे त्या आवर्जून म्हणाल्या. यादरम्यान ॲड यशोमती ठाकूर यांनी मुलींनी सादर केलेल्या विविध कलागुणांना मनसोक्त दाद दिली.
एम. पी. शहा मुलींचे कनिष्ठ महाविद्यालयाचे काम खूप चांगले चालले आहे. त्यामुळे अशा या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रेरणा मिळतील अशा व्यक्ती प्रमुख पाहुण्या म्हणून आपण वार्षिक स्नेहसंमेलन, गुणगौरव सोहळ्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होतो. ॲड. यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीने आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पॉवरफूल वुमेन्सची थेट भेट या निमित्ताने घडवून आणता आली.