Home > News > महावितरणाचा 'भोंगळ कारभार'; महिला शेतकऱ्याला दीड लाखाचे बिल

महावितरणाचा 'भोंगळ कारभार'; महिला शेतकऱ्याला दीड लाखाचे बिल

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याला महावितरण विभागाने चक्क दीड लाखाचे विद्युत बिल पाठवले आहे. विशेष म्हणजे या महिला शेतकऱ्याने कृषी वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केला होता, मात्र अद्यापही तिला वीज कनेक्शन मिळालेले नाही.

महावितरणाचा भोंगळ कारभार; महिला शेतकऱ्याला दीड लाखाचे बिल
X

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याला महावितरण विभागाने चक्क दीड लाखाचे विद्युत बिल पाठवले आहे. विशेष म्हणजे या महिला शेतकऱ्याने कृषी वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केला होता, मात्र अद्यापही तिला वीज कनेक्शन मिळालेले नाही.

माहूर तालुक्यातील गोकुळनगर येथील अल्पभूधारक शेतकरी ज्योती सुभाषराव डाखोरे यांच्या नावे तीन एकर जमीन आहे. त्यांनी २०११ मध्ये त्यांच्या शेतात विहीर बांधली. त्यानंतर वीज जोडणीसाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये महावितरणकडे ६ हजार ७२० रुपये कोटेशन भरले होते. मात्र, अद्यापही त्यांना वीज कनेक्शन मिळालेले नाही.

वीज कनेक्शनसाठी वृद्ध दांम्पत्य महावितरण कार्यलया समोर चकरा मारत होते. सातत्याने पाठपुरावा करूनही वीज कनेक्शन मिळत नसल्याने त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नांदेडकडे तक्रार केली. मंचने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी निकाल दिला. त्यानुसार आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत वीज जोडणी करून द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र, आदेशानुसार वीज जोडणी करण्यात आली नाही. वीज कनेक्शनसाठी कोटेशन शुल्क भरून अकरा वर्षाचा कालावधी लोटला असतानाही वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, महावितरण कंपनीकडून त्यांना १ लाख ५८ हजार ६४४ रुपयाचे विद्युत बिल आकारण्यात आले आहे.

या कारभारावर डाखोरे दांम्पत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाच्या जाहिराती करत आहे. दुसरीकडे, पैसे भरूनही अकरा वर्ष वीज जोडणी दिल्या जात नाही. महावितरणाचा भोंगळ कारभार आणि शासनाची दुटप्पी भूमिका यात शेतकरी मात्र चांगलाच भरडला जात आहे.

शेतात सिंचनाची सोय असूनही वीज जोडणी मिळत नसल्याने बागायत शेती करण्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. महावितरणाने याकडे लक्ष देऊन तातडीने वीज जोडून देण्याची मागणी होत आहे.

निष्कर्ष:

महावितरण विभागाचा हा भोंगळ कारभार हा शेतकऱ्यांच्या हक्कांवर आघात आहे. महावितरणाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून संबंधित शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही करावी.

Updated : 30 Jan 2024 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top