Home > News > इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? कंगनाच्या वक्तव्यावर वरुण गांधीं संतापले...

इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? कंगनाच्या वक्तव्यावर वरुण गांधीं संतापले...

इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? कंगनाच्या वक्तव्यावर वरुण गांधीं संतापले...
X

अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तिने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.

ती या व्हिडीओमध्ये म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. या वक्तव्यावरुन आता भाजप नेते वरुन गांधी यांनी संताप व्यक्त करत कंगनावर निशाणा साधला आहे. कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर, तर आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह? अशा शब्दात वरुन गांधी यांनी कंगना कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. कंगना राणौतच्या 'आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं.' या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

Updated : 11 Nov 2021 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top