- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

कंगना रणौतचं वरुण गांधीला उत्तर म्हणाली 'जा आता रड'
X
अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. काही लोकांनी तर तिचा पुरस्कार परत घेण्याची मागणी केली आहे. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तिने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.
ती या व्हिडीओमध्ये म्हणते..
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. या वक्तव्यावरुन भाजप नेते वरुण गांधी यांनी संताप व्यक्त करत कंगनावर निशाणा साधला होता.
कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर, तर आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला आहे.
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z
वरुन गांधी यांच्या या टिकेला कंगनाने इन्स्टाग्रामवर उत्तर दिलं आहे.
"मी म्हटलं आहे की 1857 चे युद्ध ही पहिली क्रांती होती, जी चिरडली गेली, त्यानंतर इंग्रजांकडून आणखी अत्याचार झाले आणि जवळजवळ एक शतकानंतर आम्हाला गांधींच्या भिकेच्या भांड्यात स्वातंत्र्य मिळाले. जा आणि आणखी रड." अशा शब्दात उत्तर दिलं आहे. कंगना राणौतच्या 'आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं.' या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना तिने आता हा वाद वाढवायचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं.