Home > News > चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरी बाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा..

चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरी बाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा..

चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरी बाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा..
X

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे अशी चर्चा वारंवार समाजमाध्यमांवर असते. इतकंच नाही तर अनेक वेळा त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी कशा दिसत होत्या आणि त्यानंतर कशा दिसत आहेत याचे फोटो देखील व्हायरल होतं असतात. अनेकांना असा प्रश्न आहे की, अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते अचानक कसे आले? अनेकांनी तर त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली असल्याचं देखील म्हंटल आहे. आता या प्रश्नावर स्वतः अमृता फडणवीसांनीच उत्तर दिले आहे. त्या एका टीव्ही शो मध्ये सहभागी झल्या आहेत. त्या कार्यक्रमात हाच प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्या या प्रश्नच उत्तर देताना काय म्हणाल्या? खरतर या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग अजून आलेला नाही कार्यक्रमातील काही भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्लास्टिक सर्जरीवर अमृता फडणवीस नक्की काय म्हणाल्या आहेत हे आपल्याला तो संपूर्ण भाग प्रदर्शित झाल्यानंतरच समजणार आहे. पण लोकांना याबाबत जाऊन घेण्याची मोठी उसुक्ता लागली आहे.


या कार्यक्रमांत अमृता फडणवीस यांना साध्य राज्यात सुरु असलेल्या राजकीय घटनांपासून ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश विचारण्यात आले आहेत. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी तसेच अनेक सिने कलाकार हजेरी लावत आहेत. अभिनेता सुबोध भावे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस साह्भागी झाल्या आहेत.

कशी नशिबाने थट्टा आज मांडली' गाणं ऐकल्यावर उद्धवजी ठाकरे यांचा चेहरा आठवतो असं देखील अमृता फडणवीस म्हंटल्या आहेत..

कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारतो. यावर त्या उत्तर देतात की, "उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला." आता अमृता फडणवीस यांनी असं म्हंटल्यानंतर समाजमाध्यमांवर अमृता फडणवीस यांची एकच चर्चा सुरु झाली आहे.

अमृता फडणवीस या वारंवार त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या नेहमीच अगदी बिनधास्तपणे आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या याच बिनधास्तपणे बोलण्याने त्यांना समाजमाध्यमांवर अनेक वेळा ट्रोल देखील केलं जातं. पण या ट्रॉलर्सना कसल्याच प्रकारे न जुमानता त्या नेहमी आपली भूमिका मांडत असतात.

आता सुद्धा अमृता फडणवीस या एक वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. याच कार्यक्रमात त्यांना कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारतो. यावर त्या उत्तर देतात की, "उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला." असं उत्तर दिले त्यानंतर आता शिवसेनेच्या अनेक लोकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होतं आहे.

Updated : 6 Aug 2022 2:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top