- कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक...
- प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या..?
- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..

अमरावतीत लॉकडाऊन - यशोमती ठाकूर
X
अमरावती, अकोला महापालिका आणि अचलपूर, अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद हद्दीत सोमवारी रात्री ८ वाजेपासून पुन्हा सात दिवस 'लॉकडाऊन'चा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद असणार आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कठोर निर्णय घ्यावे लागेल असा इशारा गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार आता सरकारने पावलं उचलण्यास सुरवात केली आहे.
तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांसाठी लाॅकडाऊनचे वेगळे आदेश काढले आहेत. ग्राहकांनी जवळची बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडूनच खरेदी करावी. उपहारगृहे, हॉटेलने पार्सल सुविधेसाठी परवानगी राहणार आहे,अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर व अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ही घोषणा केली.
तसेच लग्न समारंभाकरिता वधू व वरपक्षासह २५ व्यक्तींना परवानगी राहील. मालवाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. भाजी मंडई पहाटे ३ ते ६ सुरू राहील,असेही आदेशात म्हंटले आहे.