Home > News > 'अण्णा हजारे प्यायचे दोन पेग रम..' अस काय घडलं त्यांनी पुन्हा दारुला हातही लावला नाही..

'अण्णा हजारे प्यायचे दोन पेग रम..' अस काय घडलं त्यांनी पुन्हा दारुला हातही लावला नाही..

काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ते लष्करी सेवेत असताना रम पीत असल्याचा एक किस्सा सांगितला होता नक्की काय घडलं होत आणि अण्णा हजारे यांचे परिवर्तन कसे झाले वाचा..

अण्णा हजारे प्यायचे दोन पेग रम.. अस काय घडलं त्यांनी पुन्हा दारुला हातही लावला नाही..
X

ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे आज जवळपास 85 वर्षेचे आहेत. अण्णांनी राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट कसा केला हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले अण्णा काही काळ लष्करी सेवेत काम केल्यानंतर गावी परत आले. आल्यानंतर त्यांनी ग्रामविकासाच्या कामांना सुरुवात केली. आणि एका दुष्काळी गावचे नंदनवन केले.

गावचा विकास करताना त्यांनी सुरुवातीला काय काम केलं असेल तर ते होतं गावातील दारूबंदीचे. कारण अण्णांना माहीत होतं दारूबंदी केल्याशिवाय गावचा विकास होणार नाही. पण तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का की, अण्णा जेव्हा लष्करी सेवेत होते त्यावेळी सुरुवातीला अण्णांनी सुद्धा दारू पिली होती. आता ही गोष्ट ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसला असेल. तर अण्णा हजारे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना निवेदकाने तुम्ही लष्करी सेवेत काम करत होता त्यावेळी कधी दारू पिऊन पाहिली आहे का? असा प्रश्न विचारला. यावर अण्णांनी हसत हसत उत्तर दिलं की, ज्यावेळी मी बर्फात गेलो होतो त्यावेळी सुरुवातीला मी दोन पेग रम पीत होतो. आता तुम्ही म्हणाल की, अण्णा हजारे दारू पितात का? तर अजिबात नाही..

तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की अण्णा हे सुरुवातीला लष्करी सेवेत होते. 1960 मध्ये लष्करात ट्रक चालक म्हणून त्यांनी काम पाहिलं व त्यानंतर त्यांनी 15 वर्ष लष्करी सेवेत कार्य बजावले. लष्करात काम करत असताना त्यांच्यासोबत घडलेला दारूचा हा किस्सा अण्णा हजारे यांनी कपिल शर्मा या कॉमेडी शो मध्ये सहभागी झाल्यावर सांगितला होता. अण्णा काय म्हणाले होते तर, ज्यावेळी बर्फाळ प्रदेशात लष्करी सेवा बजावत असताना सुरवातीला मी दोन पेग पीत होतो. पण जेव्हा स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक वाचले त्यावेळी मला जीवन लक्षात आले. खाणं-पिणं आणि मरून जाणे एवढं करण्यासाठीच जीवन नाही. त्या ठिकाणी फ्री रम मिळत होती पण मी कधीही हात लावला नाही. प्रत्येक जेवणाला दोन बॉटल रम दिली जाते. पण मी कधीही घेण्यासाठी गेलो नाही.

अण्णा हजारे यांचे सामाजिक क्षेत्रातील काम हे मोठे आहे. राळेगण सिद्धी मध्ये दारूबंदी, अस्पृश्यतानिवारण, पाणलोट क्षेत्र विकास व जलसंधारण, वनीकरण अशा माध्यमातून त्यांनी गावाला जगाच्या नकाशावर एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. एवढेच नाही तर लोकपाल बिलाच्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णांनी केलेलं उपोषण देखील सर्वांना आठवत असेल. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन व अन्य मागण्यासंदर्भात त्यांच्याबाबत वेगवेगळी मते असू शकतात व त्यांचा भूमिकेबाबत कदाचित अनेकांची अनेक मते होऊ शकतात. पण माहितीचा अधिकार कायदा आणि आदर्श गाव राळेगणसिद्धी बाबत अण्णांचे काम कैतुकास्पद आहे.

Updated : 17 Jun 2022 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top