Home > News > राज्यात काल 8 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त..

राज्यात काल 8 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त..

राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

राज्यात काल 8 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त..
X

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. राज्यात आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. सरकार अनेक निर्बंधात शकतीलता आणत आहे. काल मंगळवार राज्यात नवीन 5 हजार 132 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 8 हजार 196 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 158 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

आजपर्यंत एकूण 62 लाख 09 हजार 364 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के एवढे आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असली तरी अजूनही नवीन कोरणा बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. पण दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

Updated : 19 Aug 2021 1:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top