भोपाळ लोकसभा मतदारसंघातली भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिने माफी मागितली. मात्र या वादामुळे राजकीय वातवरण तापले असून याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. याबाबतचा निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की या वक्तव्याबाबत मध्य प्रदेशच्या सीईओंना शुक्रवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. निवडणुकांदरम्यान अशांतता पसरू नये म्हणून साध्वी प्रज्ञाविरोधात कारवाईची देखील शिफारस करण्यात आल्याचे समजते.
Updated : 17 May 2019 12:19 PM GMT
Next Story