Home > Max Woman Blog > कसा मिळाला दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार? राम पुनियानी

कसा मिळाला दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार? राम पुनियानी

दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार का नव्हता? याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलंय? कसा मिळाला दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार? बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडताना ब्राह्मणांच्या वर्चस्वाबाबत काय म्हटलंय? बाबासाहेबांना हार घालणारेच बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे का? पाहा प्रसिद्ध इतिहासकार राम पुनियानी यांचं विशेष विश्लेषण

कसा मिळाला दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार? राम पुनियानी
X



त्यानंतर महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. हा सत्याग्रह केल्यानंतर तेथील सवर्ण लोकांनी चवदार तळ्याला स्वच्छ केलं. या सर्व घडामोडींबद्दल प्रसिद्ध इतिहासकार राम पुनियानी सांगतात. बाबासाहेब आंदोलन करुन गेल्यानंतर ब्राह्मणांच्याकडून मंत्रोउच्चार करून पाण्याचं शुद्धीकरण करण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह... अहिंसात्मक पद्धतीने लोकांना समुह एकत्र करून बाबासाहेबांनी आंदोलन केलं. फक्त पुस्तक लिहून परिवर्तन होणार नाही. याची जाणीव बाबासाहेबांना झाली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रत्यक्ष कृती करून लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

त्यावेळी दलित महिलेला पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी बाबासाहेबांनी या महिलांना इतर महिला ज्या पद्धतीने साडी परिधान करतात. त्याच पद्धतीने तुम्हीही साडी परिधान करा. असं या महिलांना सांगितलं. एकीकडे बाबासाहेबांनी लोकतांत्रिक मुद्यावर काम केलंच दुसरीकडे सामाजिक बाबतील दलितांच्या अधिकारांबरोबरच महिलांच्या अधिकारावर देखील काम केलं. कालाराम मंदीर आंदोलन देखील याच प्रयत्नांचा भाग होता. असं मत डॉ. राम पुनियानी यांनी बोलताना व्यक्त केलं आहे.

व्हिडिओ सौजन्य - मॅक्स महाराष्ट्र

Updated : 14 April 2021 4:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top