Home > Max Woman Talk > जिल्हा परिषद ते राज्यमंत्री Aditi Tatkare यांचा राजकीय प्रवास...

जिल्हा परिषद ते राज्यमंत्री Aditi Tatkare यांचा राजकीय प्रवास...

जिल्हा परिषद ते राज्यमंत्री Aditi Tatkare यांचा राजकीय प्रवास...
X

घरात राजकीय वारसा असेल तर राजकारणातील एन्ट्री सोपी होते. सहजगत्या राजकीय वारसा असलेल्या व्यक्तीला राजकारणात प्रवेश करता येतो मात्र प्रवेश केल्यानंतर त्याला यश मिळेल की नाही हे मात्र ज्याच्या त्याच्या पात्रतेवर ठरत असतं. भलेही एखाद्या पुढाऱ्याचा नेता म्हणून त्याला एखाद्या पक्षाचे तिकीट मिळू शकतं पण शेवटी तो नेता होण्यायोग्य आहे की नाही हे जनतेच्या दरबारातच ठरवलं जातं. आणि राजकीय वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा अनुभव आलेला असेल. आता या संदर्भात अत्यंत मोठं उदाहरण आपल्या समोर आहे ते म्हणजे शरद पवार यांचे दोन नातू.. आज आपण पाहतोच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राजकारणात चांगला जम बसवला पण पवार साहेबांचे दुसरे नातू पार्थ पवार यांना मात्र जनतेने नाकारलं. म्हणजे काय तर राजकीय वारसा असो वा नसो राजकीय नेतृत्व करण्यासाठी ज्या काही कसोट्या असतात त्या सर्वांनाच पार कराव्या लागतात.

अशा सर्व कसोट्या पार करून राजकारणात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेल्या नेत्या म्हणजे माजी राज्यमंत्री अदिती तटकरे. वडिलांची फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना देखील अगदी महाविद्यालयीन काळापासून वेगवेगळी आंदोलन, उपोषण इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास जिल्हा परिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष त्यानंतर आमदार आणि महाविकास आघाडीच्या काळात पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात राज्य मंत्रिपद असा हा त्यांचा राजकीय प्रवास. हा प्रवास आपल्याला ऐकायला सोपा वाटतो पण तो किती खडतर होता ते देखील एकदा पहा...

अदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) यांना जरी मोठा राजकीय वारसा असला तरी सुरुवातीला त्या राजकारणात येणार की नाही हे त्यांना देखील ठाऊक नव्हतं.. म्हणूनच त्यांनी महाविद्यालयीन काळात शिकत असताना राज्यशास्त्र आणि इतिहास असे विषय निवडले होते आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात फेलो प्रोफेसर म्हणून काम करण्यास सुरवात केली. पण त्यांचा हा प्रवास काही काळापुरताच मर्यादित राहिला कारण त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची वेळ आली.. 2009 मध्ये सुनिल तटकरे (Sunil Tatkare)यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यात पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यांची जबाबदारी वडिलांनी त्याच्यावर दिली आणि त्यांची राजकारणातील एन्ट्री झाली. जिल्हा परिषद निवडणूक, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा प्रवासानंतर 2019 च्या निवडणूकीत त्यांना विधानसभेची संधी आणि त्यानंतर मंत्रीमंडळात काम करण्याचीही संधी दिली. त्यानंतर वेगवेगळ्या आठ खात्यांचा पदभार अदिती तटकरे सांभाळत होत्या. पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलेल्या अदिती तटकरे यांनी ही सर्व खाती अत्यंत प्रभावीपणे सांभाळली. त्यानंतर त्यांच्या खांद्यावरती आणखीन चार खात्यांची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्या चार खात्यांची नावे देखील आदिती तटकरे यांना आठवतं नाहीत.. आता एखाद्या खात्याचे मंत्रीपद तुम्हाला मिळतं आणि त्याचं नाव तुम्हाला माहित होत नाही किंवा आठवतं नाही असं कसं होऊ शकतं?

आदिती तटकरे ज्या आठ खात्यांचा पदभार सांभाळत होत्या त्या व्यतिरिक्त त्यांना आणखीन चार खात्यांचा पदभार देण्यात आला, म्हणजेच एकूण बारा खाती राज्यमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्याकडे होती. पहिला आठ खात्यांचा पदभार सांभाळत असताना त्यांच्यावर 2022 च्या जून मध्ये फक्त चारच दिवसांसाठी आणखीन चार खात्यांचा पदभार देण्यात आला होता. असा हा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे. मुंबई MaxWoman आयोजित MaxWoman Conclave या कार्यक्रमात अदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या. आणि याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास उलगडला आहे. हा प्रवास करत असताना आलेल्या अनेक अडचण, त्या अडचणींवर मात करण्यासाठी केलेली धडपड आणि आता आमदार या पदापर्यंतची वाटचाल या संपूर्ण प्रवासाविषयी त्यांनी MaxWoman Conclave मध्ये सांगितले आहे. हा संपूर्ण एपिसोड तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही MaxWoman च्या फेसबुक आणि युट्युब चॅनेल ला नक्की भेट द्या..

Updated : 18 May 2023 2:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top